मुंबई (प्रतिनिधी) : राज्यातील सरकारी कार्यालये सुरूच राहणार आहेत. ते बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला नाहीअत्यावश्यक बस आणि रेल्वे सेवा सुरूच राहणार आहेअशी माहिती मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिली. करोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यातील परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी मंत्रिमंडळाची बैठक घेण्यात आली. त्यावर सविस्तर चर्चा झाली. मात्र, सरकारी कार्यालये बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आला नाही, असं स्पष्टीकरण मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलं. तसंच लोकल आणि बससेवा अत्यावश्यक असल्यानं बंद होणार नाही, असंही त्यांनी सांगितलं. सरकारी कार्यालयं सात दिवस बंद राहणार असल्याची चर्चा होती. मात्र. मख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या चर्चेला पूर्णविराम दिला आहे. राज्यातील सरकारी कार्यालये बंद राहणार नाहीत, तसंच लोकल आणि बस सेवा ही अत्यावश्यक आहे. त्यामुळं तीही बंद करण्याचा कोणताही निर्णय घेण्यात आलेला नाहीअसं मुख्यमंत्री उध्दव ठाकरे म्हणाले. सरकारी कार्यालयांतील कर्मचारी संख्या ही ५० टक्क्यांवर आणण्याबाबत विचार सरू आहे, असं त्यांनी सांगितलं.
सरकारी कार्यालये बंद नाहीत; ट्रेन, बस सुरूच राहणार : मुख्यमंत्री उध्दव ठाकरे